मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलं आहे, त्यामुळे नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं वक्तव्य अभिनेता शाहरुख खाननं केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुख खान चांगलाच अडचणीत आला होता. शाहरुखनं केलेलं ते वक्तव्य केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात असल्याचा अनेकांचा समज झाला. पण आपल्याला कोणत्याच राजकीय पक्षाचे विरोधक नसल्याचं आता शाहरुख न स्पष्ट केलं आहे. 


आपला चित्रपट फॅनच्या प्रोमोशनसाठी शाहरुख इंडिया टीव्हीच्या आप की अदालत या शो मध्ये आला होता, तेव्हा त्यानं हे वक्तव्य केलं. तसंच नकारात्मकता पसरवण्यापेक्षा बहुमतानं निवडून दिलेल्या पंतप्रधानांना पाठिंबा देऊन देशाला पुढे न्यायला मदत करा, असा सल्लाही शाहरुखनं दिला आहे.