मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे. नोटबंदीमुळे 50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी होऊ असा खोचक टोला जया बच्चन यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीबाबतचा उद्देश चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली नसल्याचंही जया बच्चन म्हणाल्या आहेत. मुख्य म्हणजे जया बच्चन यांनी अशी टीका केली असली तरी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मात्र नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. यामुळे नोटबंदीवरून बच्चन कुटुंबियांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसून येत आहे.