बंगळुरू :  बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर बांगलादेशला पाठिंबा देत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सुरू असलेला सामना भारतासाठी खूप महत्वाचा सामना आहे. या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल तो जवळपास स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. किंवा नेट रनरेटच्या चक्रात फसू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश दोन्ही प्रयत्न करणार आहे. 


शाकिबची फटकेबाजी भारतीय प्रेक्षकांचा जल्लोष 


यंदाच्या वर्ल्ड टी -२०मध्ये भारतीय प्रेक्षकांचा चांगल्या क्रिकेटला पाठिंबा दिसला आहे. पण बांगलादेश जिंकल्यावर भारताला अधिक फायदा होऊ शकतो यामुळे भारतीय प्रेक्षकांननी शाकिब अल हसन यांच्या फटकेबाजीवर जोरदार जल्लोष केला.