मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यानं त्याचा पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उरी हल्ल्यानंतर राजू श्रीवास्तवनं कराचीमध्ये होणारा हा कार्यक्रम न करायचं ठरवलं आहे. उरी हल्ल्याचा निषेध म्हणून मी हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया राजू श्रीवास्तवनं दिली आहे.