मुंबई: शाहरुख खान आणि सलमान या दोघांमध्ये झालेल्या वादावर पडदा पडला आहे. शाहरुखनं सलमानच्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये दिलवालेच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. त्यावेळी या दोघांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. निमित्त आहे ते टाईम्स ऑफ इंडिया फिल्म अवॉर्डचं. या सोहळ्यावेळी बॉलीवूडचे हे करण-अर्जुन एका स्टेजवर येतील, अशी माहिती मिळत आहे. तसंच हे दोघं एका गाण्यावर परफॉर्म करतील असंही बोललं जात आहे. 


दुबईमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला अमिताभ बच्चन, करिना कपूर, आलिया भट, रणवीर सिंग उपस्थित राहणार आहेत. 


सलमान आणि शाहरुखमधले संबंध सुधारत असले तरी या शाहरुखचा रईस आणि सलमानचा सुलतान एकाच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन खानांमधला कोणाला प्रेक्षकांची पसंती मिळते ते लवकरच कळेल.