मुंबई : जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे. महिलांचा आदर करायला हवा यावर भर देताना शाहरूख खाननं बेंगळूरूमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांना चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला हवी आणि पुरूषांनी महिलांचा सन्मान करायलाच हवा अशी अपेक्षा शाहरूखने व्यक्त केली आहे.


आपल्या मुलांनीही महिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आदराची वागणूरक दिली पाहिजे. आर्यन एवढंच नव्हे तर अबरामलाही आपण तशी तंबी दिल्याचे व त्यांनी महिलांचा अनादर केल्यास मुंडकं उडवण्याची ताकीद दिल्याचं शाहरुखने म्हंटलं आहे.