मुंबई : बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे. करणनंच त्याचं आत्मचरित्र 'द अनसुटेबल बॉय’ या मध्ये यासंदर्भातला खुलासा केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर सगळ्यात मोठा वॉर झाला. आता दोन महिन्यांनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण करण जौहरने अजुन एक धमाका केला आहे. द अनसुटेबल बॉय’ या त्याच्या आत्मचरित्रात करण काजोलसोबतच्या नात्यावर बोलला आहे.


आमच्यात आता सगळं संपलं आहे. काजोल माझ्या आयुष्यात आता पुन्हा कधीच येऊ शकत नाही. कदाचित तिलाही तेच हवं आहे. मी काजोल आणि अजय बरोबर आता कुठलेच संबंध ठेऊ इच्छीत नाही. २५ वर्षांपासून असलेली आमची मैत्री आता संपली आहे, असं निर्माता-दिग्दर्शक करण जौहरने म्हटलं आहे.


सगळयांनाच माहिती आहे की ऐ दिल है मुश्किल आणि शिवाय च्या रिलीजच्या आधी फिल्म समीक्षक कमाल आर खानने अजय देवगनच्या शिवायची निगेटीव्ह पब्लिसीटी करण्यासाठी करण जौहरने त्याला २५ लाख रुपये दिल्याचा दावा केला होता..अजय देवगनने कमाल आर खान आणि शिवायचा कोप्रोड्युसर कुमार मंगतमध्ये झालेल्या संवादाची एक ऑडियो क्लिप सोशल मिडीयावर पोस्ट केल्यामुळे खळबळ उडाली होती.


काजोलनेही अजयची ही पोस्ट शेअर करत हे सगळं धक्कादायक असल्याचं म्हंटलं होतं. काजोल सुरुवातीपासूनंच या बॉक्स ऑफिस क्लॅशमध्ये आपल्या नव-याची साथ देत होती..या सगळ्या वादात  काजोलने करण जौहरच्या मैत्रीवर संशय घेतला..त्यामुळे करण चांगलाच दुखावला गेलाये..आणि यामुळेच अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणा-या या जोडीची मैत्री तुटली.