मुंबई : बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा उघड झालाय.मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषाचे आजोबा विरेंद्र नाथ बॅनर्जी यांनी प्रत्युषाच्या मृत्यूबाबतची भविष्यवाणी तिच्या लहानपणीच केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर प्रत्युषाचे आजोबा इंजीनियर होते. ते तारापोर अॅटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये काम करत होते. तसेच जमशेदपूरचे प्रसिद्ध ज्योतिष अशीही त्यांची ओळख होती. 


मीडिया रिपोर्टनुसार, प्रत्युषा जेव्हा लहान होती तेव्हा त्यांनी भविष्यवाणी केली होती की २४व्या वर्षात तिचे लग्न झाले नाही पाहिजे. नाहीतर हे लग्न तिच्यासाठी धोकादायक ठरु शकते. तसेच प्रत्युषा आपल्या जीवनात यश मिळवेल मात्र तिचा आकस्मिक मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. दुर्भाग्याने त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. 


रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या जन्मानंतर तिच्या आजोबांनी तिची कुंडली बनवली होती. मात्र तिची कुंडली पाहून आजोबांही चकित झाले. त्यावेळी त्यांनी प्रत्युषा आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करेल असे सांगितले होते. मात्र तिच्या मृत्यूबाबतची भविष्यवाणी त्यांनी अभ्यासानंतर केली होती. प्रत्युषा आपल्या आजोबांची लाडकी नात होती. १ एप्रिल रोजी प्रत्युषाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली.