मुंबई : ब्रेकअपच्या बातम्यांनंतर या दोघांचे पुन्हा सुर जुळू लागले आहेत असे दिसून येत आहे. हे दुसरे-तिसरे कोणी नसून आहेत विराट-अनुष्का.
आयपीएल संपताच विराट आराम करत न बसता थेट अनुष्काला भेटायला मुंबईला पोहोचला. अनुष्का आपल्या फिल्मच्या शूटिंगकरिता बुडापेस्टला (हंगेरी) जात होती तेव्हा विराट तिला सोडायला एअरपोर्टलादेखील गेला होता.


इंडिया.कॉमच्या वृत्तानुसार विराट चक्क अनुष्काच्या प्रोडक्शनचा फिल्लौरी या फिल्मच्या सेटवरच जाऊन पोहोचला. विराटला सेटवर पाहून सेटवरील अन्य लोकांप्रमाणेच अनुष्कालाही आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी विराट-अनुष्काने एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत होते आणि खूप खूश होते.