मुंबई : नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे. या निषेधामध्ये आता किंग खान शाहरुखची भर पडली आहे. माझ्या मुलांनी असं काही केलं तर मी त्यांचं मुंडकं उडविन अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांशी सौजन्यांनं वागलं पाहिजे. त्यांना सन्मान दिला पाहिजे, ही आपली संस्कृती असल्याचं मी आर्यन आणि अबरामला सांगितल्याचं शाहरुख म्हणाला आहे. फेमिनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखनं हे वक्तव्य केलं आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या विनयभंगावर आमीर खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंही भाष्य केलं होतं.