उल्हासनगर:  उल्हासनगरच्या जय माता दी मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झालाय. जय माता दी मंडळाच्या गणेशमूर्तीवर वीजेची तार पडल्यामुळे या मंडळाचे दोन तरुण कार्यकर्ते जागीच ठार झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री जेएमडी मंडळाच्या गणेशमूर्तीचे आगमन होत असताना उल्हासनगरमधील सुपर पॉंईट हॉटेल जवळ विजेची तार गणेशमूर्तीवर पडली होती.


यावेळी गणेशमूर्ती जवळ उभे असलेले हितेश सचदेव व हितेश तलरेजा हे दोन तरुण विजेचा शॉक लागून जागीच ठार झाले तर सुनील रोहरा जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.