बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कव्हळा जिल्हापरिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विषबाधा झालेली ही सर्व मुंलं 8 ते 13 वर्ष वयोगटातील आहेत. शुक्रवारी दुपारी दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह  भोजन देण्यात आले होते. ते खाल्लयानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या.


विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं कळताच गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या 3 अँब्युलन्सद्वारे 42 विद्यार्थ्यांना रात्रीच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.