पिंपरी-चिंचवड: अनधिृत बांधकाम प्रकरणी श्रीकर परदेशींनी लवचीक भूमिका घेतली नाही, त्यामुळेच आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे लागलो आणि परदेशींची बदली करवून घेतली, अशी कबुली पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल यांनी दिली आहे. 


परदेशी हे शिस्तप्रिय होते, पण काम करताना लवचिकता ठेवावी लागते, जी परदेशींमध्ये नव्हती, त्यामुळे आम्ही दादांकडे परदेशींच्या बदलीचा तगादा लावला आणि त्यांनी परदेशींची बदली केली, पण परदेशी असताना अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त होती, ती आता दिसत नाही, असंही बहल म्हणाले आहेत.