पळशी : राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करुनही बाबा विसरले अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. 


आत्तापर्यंत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला पण पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा दिला आणि आघाडी सरकार पडलं. राष्ट्रवादीन मदत केली म्हणून कराड मधून हे निवडून आले मात्र आता केलेली मदत ते विसरले अशी टीका अजित पवार यांनी केलीयं. 


पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.