सोलापूर :  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक विधान केल्याने जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. पूर्वी आमदार ५० लाख रुपयात फुटायचे, पण आता तेवढ्यात साधा नगरसेवक देखील फुटत नाही, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक तयारी मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्मचा अनुभव सांगताना हे उदाहरण दिले. विलासराव देशमुख  पहिल्यांदा निवडून आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या काळात आमदारांची फूट थांबविण्यासाठी बंगळुरूला न्यावे लागले होते, असे अजित पवार म्हणालेत.


त्याकाळात ५० लाख रुपयांत आमदार फुटत होते. त्यामुळे विलासराव यांनी यापेक्षा नव्याने निवडणुकांना सामोरे जाऊ, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आताची राजकीय परिस्थिती तशी राहिली नाही. आता ५० लाखात नगरसेवक देखील फुटत नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.