मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली. नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ठाणे भिवंडी बायपासवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


ठाणे ते कल्याण या अवघ्या अर्धा तासाच्या प्रवासासाठी तब्बल 4 ते 5 तास लागत आहेत.वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत आहेत तर भिवंडी ते कल्याण मार्गावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.