पुणे : पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकांपूर्वी जाणीवपूर्वक हे केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


पुणे मेट्रोला जाणीवपूर्वक उशीर केला जात असून, मतं मिळवण्यासाठी नेमकं निवडणुकांपूर्वी  मेट्रो कामाचं भूमिपूजन भाजप करेल असा दावाही त्यांनी केला आहे.