दिवा, ठाणे : भाजपच्या हाती सत्ता दिली तर दिव्यातलं डंपिंग ग्राऊंड बंद करूच तसेच इथे विकासकामे केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवावासियांना दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यामध्ये निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.


आपण एमएमआरडीएच्या माध्यमातून दिवा दत्तक घेऊन विकास करणार आहोत. ठाण्यात संजीव जयस्वाल यांच्यासारखा आयुक्त आणला. त्यांनी खंडणीखोर नगरसेवकांना वेसण घातली आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना तुरूंगात टाकू, दिव्यातही परिवर्तन करा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.