अकोला : राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 'इथं सिंहाचा उंदीर आणि उंदराचा सिंह व्हायला वेळ लागत नाही' असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर भाजपवर जातियवादाचा आरोप करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार आणि काश्मीरमधील नेते फारुक अब्दुल्ला यांच्यासारखे नेते, भाजपच्या ताटात जेऊन गेल्यानंतरही, असा अरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. 


अकोल्यातील भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यात भाजपची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, भाजपचे आमदार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.