औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-कन्नड रस्त्यावर पूल कोसळून झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिल्लोड शहरापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर हा निजामकालीन पूल आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती करु, असं आश्वासनही दिलं होतं.