कल्याण : तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर आलीय. दुपारी 4.50 वाजता कल्याणहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालीय. 


विठ्ठलवाडीजवळ पहाटे 6 वाजल्याच्या दरम्यान रेल्वे रुळावरून घसरल्यानं अपघात घडला होता. त्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प होती. 
  
सकाळी विठ्ठलवाडी आणि कल्याण दरम्यान कुर्ला अंबरनाथ गाडीचे पाच डबे घसरले... त्यामुळे सकाळपासून कर्जतकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणकडून अंबरनाथ, बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. अपघात इतका भीषण होता, की कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यानच्या डाऊन ट्रॅकचं मोठं नुकसान झालं होतं. पहाटेच्या वेळी डाऊन लोकलमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली.