जळगाव : आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जळगाव जिल्ह्यातील म्हसावद इथं जाहीर प्रचारसभा झाली. जळगाव जिल्हा नेहमीच भाजपचा पाठिराखा राहिलेला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता द्या जिल्ह्याचा विकास करुन दाखवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले. 


दरम्यान, महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची या सभेला उपस्थिती होती.