औरंगाबाद : सध्या सरकारचं धोरण सहकार चळवळीला पोषक आहे का असा विचार करण्याची वेळ आली आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.


काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगला असला तरी त्याचं नियोजन चुकल्याचं पवार म्हणालेत. या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका हा सहकार चळवळीला बसल्याचा आरोपही पवारांनी केला आहे. यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.