ठाणे : ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे घातपात प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. दिव्याजवळ रेल्वे रुळावर रॉड ठेवल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. हे सर्व आरोपी मुंब्र्यातील रहिवासी आहेत. सर्वांना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तळोजा जेलमध्ये असलेल्या एका सराईत गुन्हेगारानं दोन हजार रुपयांची पैज लावली होती. त्यासाठी या पाच जणांनी २४ जानेवारीच्या रात्री सव्वा सहा मीटर लांब आणि साडे तीनशे किलो वजनाचा रॉड दिव्याजवळ रेल्वे रुळावर ठेवला होता.


मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला अडथळा निर्माण करण्यासाठी हा रॉड ठेवण्यात आला होता. दानिश शेख, सुरज भोसले, मोहम्मद शेख, नजीर सय्यद आणि जयेश पारे अशी या पाच आरोपींची नावे आहेत. केवळ दोन हजार रुपयासांठी हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घातले होते की घातपात घडवण्याचा डाव होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.