लोणावळा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धक्कादायक विधान केलेय. राज्यातील हातभट्ट्या बंद करु नका असे म्हटले आहे. लोणावळ्यात ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील हातभट्ट्या बंद होत नसेल आणि लोकांना ती आवडत असेल तर त्या दारूला इंग्रजी आणि देशी दारू प्रमाणे रीतसर परवाना द्या, असं प्रतिपादन मंत्री रामदास आठवलेंनी केले आहे.


या धंद्यात लाखो तरुण गुंतलेले आहेत. यामुळे या धंद्यामधून हप्त्याच्या रूपाने जो काळा पैसा पोलिसांच्या खिशात जातो तो कारच्या रूपाने शासनाला मिळेल असं ते म्हणालेत.