नांदेड : सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांची मदत झालेली होती हे विसरु नका अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. अशा पद्धतीने मित्रांना विसराल तर त्याचे परिणाम काय होतात हे भविष्यात समजून येईल, असा गर्भित समजही राजू शेट्टी यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याकडे सत्ता आहे म्हणजे आपल्याकडेच सगळं आहे असं समजणं चूक असल्याचं ते म्हणाले. भाजप स्वतःचा पक्ष वाढवत असेल तर आपणही हात बांधून बसणार नाही असं सांगतानाच, घटक पक्षांसोबत एकत्र येऊन आगामी जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचे सूचक संकेतही राजू शेट्टींनी यावेळी दिले.