ठाणे : महाराष्ट्रात फक्त मराठवाडाच नाही तर इतर भागातही भीषण दुष्काळ असल्याचं या फोटोवरून दिसून येतं, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवविवाहितेला हळद धुण्यासाठी पाणी नाही, म्हणून पाण्यासाठी तिलाच पायपीट करावी लागतेय, हे या फोटोवरून दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील कसार्‍याजवळच्या लतीबवाडी पाड्यावरील हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. पण हा फोटोवर फोटो शॉपने करामत केली नसेल तर बरं, कारण सध्या अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फोटोशॉपच्या मदतीने अफवा पसरवत असतात.


आपल्या परिस्थितीची जाण राखत कोणताही मानपान आणि लाज न बाळगता दोन हंडे घेऊन पाण्याला जाणाऱ्या या नवरीचे तोंडभर कौतूकही केले आहे. मात्र महाराष्ट्राला पाण्यासाठी आणखी पुढील ५० वर्षांचं नियोजन करणे महत्वाचे आहे.