जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीपद गेल्याची सल काही शांत बसू देत नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण जळगावात आज त्यांनी पुन्हा आपलं दु:ख बोलून दाखवलं. जळगावात  राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ खडसे म्हणाले, 'काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. कुणी पुरावेही दिलेनाही.त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.'


जिल्हा बँक सभागृहात रविवारी दुपारी १२ वाजता हा मेळावा झाला. या मेळाव्यात कनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र या तीनही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नाही. खडेस आणि महाजन जवळ बसले होते आणि एकमेकांशी अधूनमधून संवाद साधत होते.