जळगाव : समाजसेविका अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांच्या विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याने जळगाव जिल्हा न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे या दोघांना पुरावे सादर करता आले नाहीत तर त्यांना आरोप महाग पडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली दमानिया यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना गंभीर आरोप केल्याने खडसेंसोबत देशभरात भाजपची बदनामी झाल्याचे दावा दाखल करताना म्हटले आहे. 


अब्रु नुकसानीचा दावा इरफान मोहम्मद फतेह या भाजप कार्यकर्त्याने दाखल केला आहे. तो भाजप अल्पसंख्यांक महानगरचा जिल्हाध्यक्ष आहे. जळगाव न्यायालयाने दमानियांविरुद्धचा दावा दाखल करुन घेतला आहे. याची सुनावणी ११ जुलैला होणार आहे.