अहमदनगर : जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी इथं ही घटना घडलीय. जाकीर शब्बीर शेख असं या ४० वर्षीय मयत शेतकऱ्याचं नाव आहे. बुधवारी रात्री २-३ वाजल्याच्या सुमारास सगळे गाढ झोपेत असताना जाकीर यांनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली.   


जाकीर यांच्या पत्नीनं आणि भावानं त्यांना फासावर लटकलेल्या अवस्थेत पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीनं नेवासातील शासकीय रुग्णालयात जाकीर यांना हलवलं... परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जाकीर शेख यांच्या मागे त्यांच्या कुटुंबात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. 


शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या करत जीवन यात्रा संपवल्याचं समोर येतंय. जाकीर यांनी शेतीसाठी जवळपास ५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ते सतत चिंतेत होते, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.