गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिलाय. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्यावरही सुरजागड प्रकल्पावरुन या पत्रकांद्वारे टीका करण्यात आलीय. स्थानिक जनतेऐवजी पालकमंत्री उद्योगपतींचं समर्थन करत असल्याचा आरोप यातून माओवाद्यांनी केला आहे.


प्रशासन आणि निवडणूक आयोग माओवाद्यांच्या या इशाऱ्यावर काय पावलं उचलणार आहे, हे निवडणुकी दरम्यानच समोर येणार आहे. पहिल्यांदा माओवाद्यांनी पालकमंत्री उद्योगपतींचं संरक्षण करत असल्याचा आरोप केला आहे.