बुलडाणा : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय. गेल्यावर्षी दुष्काळ नसतानाही, आम्ही शेतक-यांना दुष्काळी मदत मिळवून दिली असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाण्यात बोलताना त्यांनी शेतक-यांच्या जखमेवर हे मीठ चोळलं. दरम्यान, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलतानाही दानवेंची जीभ घसरली. सोनियांना खाली न बघता भाषण करता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.