सांगली :- राज्यसरकार मार्फत 2019 पर्यत प्रत्येक गरीब माणसांना घर दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी केंद्रसरकारने पुढील तीन वर्षात १ कोटी घरे बांधण्याची घोषणा केली होती. त्याला जोड म्हणून मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील जनतेला खुशखबर देत प्रत्येक गरिबाला घरे देण्याचा मनोदय बोलून दाखवला. 


मागील 10 वर्षापासून रखडलेल्या राज्यातील नगरपालिकांच्या 28 पाणी योजना, 2017 पर्यंत पूर्ण करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  


तसेच नकाशे तयार करण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येत आहे.  संगणकवर नकाशे मंजूर करून तीन दिवसात दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.  


500 रुपयाच्या नोटा बंद केल्या पासून काश्मीर मध्ये एक सुद्धा दगड पडला नाही. कारण दगड मारण्यासाठी ही 500 रुपयाची नोट दिली जात होती, दहशतवाद्याना आणि बनावट नोटाना आळा तसेच काळ पैसा जमवणार्यांना चाप बसला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.