मी भाजपवर नाराज आहे असं म्हणण्या पेक्षा मी कोणत्याचं पक्षाच्या कारभारावर खुष नाही. आम्ही एका विशिष्ट हेतूने राजकारण करत आहे. पण लोकांची रस्त्यांवर असताना एक भाषा असते आणि  सत्तेत गेल्यावर एक भाषा हे मला पटत नाही आणि लोकांनाही आवडत नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीन निवडणुकीत उतरेल.


ही निवडूक लढत असताना आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वेळ पडली तर काँग्रेस आणि इतर स्थानिक आघाड्यांना सोबत घेवून लढू असंही खासदार राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.