नागपूर : आजवर भारतानं आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. थोडा जरी तणाव निर्माण झाला की अमेरिका भारताला शांत राहण्याचा सल्ला द्यायची, पण आता आपण कुणालाही न सांगता आपली शक्ती दाखवून दिली. त्याला कुणी विरोधही केला नाही. उलट सगऴे देश आपल्या पाठीशी उभे राहिलेत. भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. नागपूरच्या मनिषनगरमध्ये दुर्गा मातेच्या दर्शनाला भागवत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.