सातारा : सातारा जिल्ह्यातील नागझरी-पुसेसावळी घाटात एक विचित्र अपघात घडला. एका इंडिका कारनं अचानक पेट घेतल्यानं चालकानं तातडीन गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या माळरानात नेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळत्या गाडीसह माळरानावरील गवतानंही पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण माळरानावरील गवत जळून खाक झालं. 


सुदैवानं ही आग आपसूकच विझली त्यामुळे मोठ्या वणव्यापासून इथलं जंगल वाचलं. मात्र गाडीनं पेट घेतल्यानंतर गाडीचालक गाडीसोडून का पळून गेला? गाडीनं पेट घेतला की तिला जाणूनबूजून पेटवण्यात आलं? असे अनेक प्रश्न उपस्थती होताहेत.. या प्रकरणी रहिमतपुर पोलीस चौकशी करताहेत.