जळगाव : अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादनंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, पदाधिकारी,नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील अशा सर्वच स्तरातील लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. 


उत्स्फुर्तपणे काढलेल्या या मोर्चात तब्बल एक ते दीड लाख लोकांनी सहभाग घेतला होता. लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असूनही रेटारेटी नाही. 


कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, कुणा राजकीय नेत्याचे भाषणबाजीचे प्रदर्शन न करता जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत मोर्चा शांततेत पार पडला.