नाशिक : विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे.


भाऊराव सोनावणे हे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी आहेत. मुलाच्या आजरपणावच्या उपचारांसाठी भाऊरावांनी एसबीआयमधून दीड लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं. माझं कर्जही माफ करण्याची मागणी मी एसबीआयकडे केली आहे, पण याबाबत एसबीआयकडून कोणतंही उत्तर आलेलं नसल्याचं भाऊराव म्हणाले आहेत. दरम्यान विजय माल्ल्याचं कोणतंही कर्ज माफ केलेलं नसल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटलींनी राज्यसभेमध्ये बोलताना दिली आहे.