पुणे : राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार आहे. शासनाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


ते पुण्यात यशदा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. कायदा तयार असला आणि दारूबंदी केली तरी लोक गावात दारू चोरून आणतील. त्यामुळे गावातील लोकांनीच एकत्र येऊन दारूबंदी केली तरच दारूमुक्ती होईल असं सूचक विधान केलं.