रत्नागिरी : महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी - रायगड या दोन जिल्हांना जोडणा-या म्हाप्रळ-आंबेत पुलाजवळ आतापर्यंत सात मृतदेह सापडलेत आणि हे सगळे इथले स्थानिक तरूण मच्छिमार यांनी आपल्या होड्या घेवून सावित्रीच्या प्रवाहाबाहेर काढलेत. मात्र एनडीआरएफ किंवा नेव्हीची एकही होडी या ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. काल एनडीआरएफचे जवान या ठिकाणी गेले मात्र ते पुन्हा माघारी परतले.


नदीचा प्रवाह बघता हे सगळे मृतदेह तब्बल ६० ते १५० किलोमीटरपर्यंत मिळतायत त्यामुळे हे सगळी शोध मोहीम आंबेत पूल आणि त्या परिसरात करणे गरजेचं होतं मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. एनडीआरएफच्या ५ बोटी आणि नेव्हीच्या ३ बोटी घटनास्थळापासून दहा किलोमीटरपर्यंतच गस्ती घालताना दिसत आहेत.


मात्र ज्या भागात सगळ्यात जास्त मृतदेह सापडतायत तिकडे होड्या नेताना दिसत नाहीत. आंबेत खाडीत जे सातही मृतदेह बाहेर काढले तो मुनीर शेख महमद मुकादम यांनी. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.


आज सलग चौथ्या दिवशीही या दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांची शोधमोहीम सुरुच आहे. आणि त्यासाठी अध्याधुनिक कॅमे-यांची मदत घेतली जाणार आहे. बोटीवर असे तीन अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येणार आहे.


पाण्याखालचं ७०० फूट खोल आणि ४०० फूट रुंद भागाचं चित्रिकरण या कॅमे-यांद्वारे करता येणार आहे.. स्वता सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाड येथील घटना स्थळाला भेट दिली आणि या शोध मोहिमेची पाहाणी केली.