रत्नागिरी : रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 40 जण जखमी झालेत. या जखमींना उपचारासाठी लांजा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 


दरम्यान दरीत पडलेली बस काढण्याचे प्रयत्न सुरु असून मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. गेल्या तीन तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.