अंबरनाथ : एकीकडे बदलापूर ते ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र अंबरनाथमध्ये विम्को नाका इथे 15 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 4 इंच व्यासाची पाईपलाईन फुटलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जातंय. 


एका संस्थेनं पाण्याचं कनेक्शन घेण्यासाठी जेसीबी खोदकाम करताना या पाईपलाईनला धक्का पोहोचला आहे. 15 दिवस झाले तरी अजून दुरूस्तीचं काम झालं नाही. नगरसेवकांनी वारंवार पत्रव्यवहार केला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कानाडोळा करत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केलीय.