नाशिक : पंचवटी परिसरात दहशत माजविणारा कुख्यात अल्पवयीन सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याचा तिघा अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी खून केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरदिवसा चाकूने गळ्यावर वार करून पप्याचा खून करण्यात आलाय. या निमित्तानं नाशिक शहरातील वाढती बालगुन्हेगारी पुन्हा उघड झालीय.


नुकताच, ओझर येथील शाळेत नववीच्या मुलाने मैदानावर वर्ग मित्राचा खून केला होता. आता पाप्याच्या हत्येच्या घटनेने शाळकरी मुलांची वाढती गुन्हेगारी मानसिकता पुन्हा एकदा ढळढळीतपणे समोर आली आहे.