वसई : सकाळपासून सुरु झालेल्या वसई विरार मॅरेथॉन स्पर्धेत मनसेचा अडथळा पहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेनं नालासोपारा ब्रिज येथे ही मॅरेथॉन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तुलींज पोलसांनी 30 ते 35 कार्यकर्त्याना अटक केली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. 


वसई-विरार अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात बलिअप्पा हा विजयी झालाय. तर महिलांच्या गटात संजिवनी जाधव हिनं विजय मिळवाय.. संभाव्य विजेती मोनिका राऊत या स्पर्धेत चक्क पाचव्या स्थानी आलीये. 


देशभरातुन पूर्ण मॅरेथॉन करिता 800 धावपटू, अर्ध मॅरेथॉनसाठी 6000 हुन अधिक आणि 11 किमी स्पर्धेसाठी 1500 च्या आसपास धावपटू सहभागी झाले. तसेच 7000 हून अधिक स्पर्धक शालेय गटांतील दीड किमी, 5 किमी व 7 किमी या शालेय गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी झालेत.