चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एका उच्चभ्रू घरातील मुलानं आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली हेमंत कुलकर्णी असं मयत महिलेचं नाव आहे. अंजली कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा कौस्तुभ यांच्यात वाद झाला होता आणि या वादातून मुलानं धारधार शस्त्रानं अंजली यांच्या हाताच्या दोन्ही नसा आणि गळा कापून हत्या केली.


हत्येनंतर कौस्तुभ घराला कुलूप लावून फरार झाला आणि त्यानं बहिणीला एसएमएस करुन हत्या केल्याचं सांगितलं.


आरोपी कौस्तुभ याचे चंद्रपूर ताडोबा मार्गावरील खत्री कॉलेजसमोर मोबाईलचे दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी कौस्तुभ हा कर्जबाजारी असल्याचा संशय आहे. यामुळेच त्याचे त्याच्या आईसोबत वारंवार खटके उडत होते. त्यातूनच हा खून झाल्याचा संशय आहे.