अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमधील पनवेलजवळ खारपाडा पुलावर ट्रक बंद पडल्याने ट्रँफिक जॅम झाले आहे. सुमारे दोन तासांपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एकेरी वाहतूक सुरु आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. 


दरम्यान, महामार्गावर रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. तसेच कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यांनी सुरुवात केल्याने महामार्गावर गाड्यांची जास्त भर पडलेली आहे.