रायगडमध्ये पावसाची विश्रांती
आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलीये.
रायगड : आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलीये.
जिल्ह्यात धुक्याची दुलई पसरली असून या धुक्यात रायगड किल्ला हरवून गेला.
कुंद वातावरण, हिरवागार शालू ल्यालेला किल्ला आणि धुक्याची चादर यामुळे इथलं वातावरण प्रसन्न झालंय.