औरंगाबाद : कुठलंही खूप जुनं नातं तुटलं की वेदना होतातच मात्र आता नवी पिढी आली आहे. नवे निर्णय होतायत तर आहे ते स्वीकारावं आणि पुढे जावं अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. शिवसेनेसोबतची भाजपची युती तुटल्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.  
तसंच सध्या वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आता प्रचारामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या.