बीड : परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय.  पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे. 


संच क्र. 5 आणि 6 मधुन पाचशे मेगावॅटची  निर्मिती होतेय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे वीज केंद्र सुरु झाल्यानं मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे.