रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झालेत.


अपघाताची भीषणता दर्शवणारं हे दृश्यं

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई - गोवा महामार्गावर खानू गावाजवळ हा अपघात झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्ता सोडून बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. 


अपघाताची भीषणता दर्शवणारं हे दृश्यं

हा अपघात इतका भयंकर होता की अपघातग्रस्त झायलो गाडीतून प्रवास करणारे चार जण जागीच ठार झाले तर सुदैवानं बचावलेला एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे. 


मृतांमध्ये वैभव मनवे, निहाल कोरियन, प्रशांत गुरव, मयुर बेलणेकर, केदार तोडकर, सचिन सावंत आणि अक्षय करेकर यांचा समावेश आहे. हे सगळे मालाड आणि विलेपार्लेमधील रहिवासी आहेत.